पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. त्यावरून पुण्यात लॉकडाऊन लागणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी सूचक विधान केले. ‘येत्या आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर नाईलाजास्तव जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल’, असे म्हणत ‘हा एप्रिल फूल समजू नका’ असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’
पुण्यातील काउन्सिल हॉल येथे अजित पवार Ajit Pawar यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना परिस्थितीविषयी आढावा घेण्यात आला. कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना व्हायरसची प्रकरणे पुण्यात वाढत असताना अजित पवार Ajit Pawar यांनी नव्या नियमांचीही घोषणा केली. तसेच ते म्हणाले, ‘पुण्यातील परिस्थिती फार गंभीर आहे. लोकांना मास्क, सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. 1 एप्रिलपासून जे काही कार्यक्रम आहेत लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ते खाजगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत’.
तसेच कोरोनाबाधितांची संख्या पुण्यात वाढत आहे. त्यानुसार 50 टक्के खाजगी बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. राज्यातील 316 लसीकरण केंद्रे ही शहर आणि ग्रामीण भागात आहे. ती दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच लग्न लॉनमध्ये करा किंवा इतर कुठेही त्याची संख्या 50 पेक्षा अधिक असू नये, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा