औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही curfew लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यातच आता औरंगाबादमधील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या नातेवाईकाची गाडी अडवली होती. त्यावर संतापलेल्या आमदार बंब आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
‘ब्रेक दी चेन’ या अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शहरात विनाकारण फिरण्यास बंदी curfew घालण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे. औरंगाबाद शहरात शुक्रवारी महात्मा फुले चौकात एका तरुणाला अडवले. त्यावर या तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची आणखी विचारपूस केली आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली. या प्रकारानंतर त्याने आमदार बंब यांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले.
या तरुणाने फोन केल्यानंतर प्रशांत बंब त्याठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारत वाद घातला. हा तरुण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाला भेटायला जात होता, त्याला का अडवले असा सवाल प्रशांत बंब यांनी केला. अशाप्रकारे पोलिस लोकांना अडवू शकत नाही, असेही बंब म्हणाले. मात्र, तरुणावर संशय आल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले.
Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’