सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Pune News | म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मुळशी तालुक्यातील माळीण गावातील ही घटना आहे. या घटनेनंतर आता गावात एकच खळबळ उडाली आहे. अजय अनुराग साठे (40) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बापू लक्ष्मण जोरी (24) असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. घटना घडल्यनंतर काही वेळात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अजय अनुराग साठे आणि आरोपी बापू लक्ष्मण जोरी यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यावरून अनेकदा त्यांच्यात भांडणं झाली होती. सोमवारी दुपारी अजय साठे हे दुपारच्या सुमारास म्हशीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांचा आरोपी बापू याच्या सोबत वाद झाला.
हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या बापूनं घरी जाऊन छऱ्याची बंदूक आणली आणि अजय यांच्यावर गोळी झाडली. यानंतर अजय जागीच कोसळले. अजय यांना असं रक्ताच्या थोराळ्यात पडलेलं पाहून आरोपी बापू यानं घटनास्थळावरून पळ काढला. अजय साठे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर काही वेळातच आरोपी बापू याला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pune News)
- ‘कंबरदुखी’पासून खुप परेशान आहात ? ‘या’ टीप्स फॉलो केल्या तर मिळेल आराम
- Video : सपना चौधरीच्या गाण्यावरील ‘या’ अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
- Pulwama Attack 2019 : ‘हल्ल्याबद्दलच्या गुप्त माहितीकडे PM मोदींनी दुर्लक्ष का केलं ?, राहुल गांधींचा प्रश्न
- वासिम जाफरने ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा झाला होता आरोप
- Business Idea : स्टॅम्प पेपरच्या व्यवसायातून भरपूर पैसा कमावण्याची संधी ! कमी पैशात मिळेल जास्त नफा, जाणून घ्या
- उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करावा समावेश, ‘हाय ब्लड प्रेशर’ येईल कंट्रोलमध्ये, जाणून घ्या