IMPIMP

Pune News : म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून गोळीबार, एकाचा खून

by sikandershaikh
Pune News

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मुळशी तालुक्यातील माळीण गावातील ही घटना आहे. या घटनेनंतर आता गावात एकच खळबळ उडाली आहे. अजय अनुराग साठे (40) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बापू लक्ष्मण जोरी (24) असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. घटना घडल्यनंतर काही वेळात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अजय अनुराग साठे आणि आरोपी बापू लक्ष्मण जोरी यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यावरून अनेकदा त्यांच्यात भांडणं झाली होती. सोमवारी दुपारी अजय साठे हे दुपारच्या सुमारास म्हशीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांचा आरोपी बापू याच्या सोबत वाद झाला.

हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या बापूनं घरी जाऊन छऱ्याची बंदूक आणली आणि अजय यांच्यावर गोळी झाडली. यानंतर अजय जागीच कोसळले. अजय यांना असं रक्ताच्या थोराळ्यात पडलेलं पाहून आरोपी बापू यानं घटनास्थळावरून पळ काढला. अजय साठे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर काही वेळातच आरोपी बापू याला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pune News)

Related Posts