मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती बिकट बनत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण आला आहे. त्यातच बीड जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व परिस्थितीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे pankaja munde यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021
राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर काही ठिकाणी गरजेनुसार लसींचा पुरवठा न केल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यातच बीडमध्येही परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे pankaja munde यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याबाबतची माहिती पंकजा मुंडे pankaja munde यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘रेमडेसिव्हिरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्यमंत्री यांना विनंती आहे, की जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाखपैकी बीडला ही पुरेशा लसींच्या मात्रा मिळाला पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत’.
काय म्हटले आहे पत्रात?
बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत जिल्ह्यात 729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 इतकी आहे. त्यातील 30 हजार 478 जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’