मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने सुरु केला आहे. स्फोटकाने भरलेली गाडी आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू नंतर भाजपने महाविकास आघडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातच या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपने सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझे हे या प्रकरणाचा तपास करीत होते. सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली होती. मात्र, वाझे यांच्या अटकेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
क्या अंबानी जैसे उद्योगपतीसे जल्द ही होनेवाले BMC चुनाव के लिए डराकर धन जुटाना किसीका मकसद था ?
हमारा सवाल है शिवसेना तथा उनके साथी वाजे की खुलकर वकालत करते हुए उसका बचाव क्यों कर रहे है ?
क्या संगीन आरोप वाले शख्स को बचाना उचित है ?— Ram Kadam (@ramkadam) March 16, 2021
भाजपचे आमदार राम कदम ram kadam यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हिंदीमध्ये ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राम कदम ram kadam यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता ? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत ? वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे ? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का ? असे प्रश्न राम कदम यांनी विचारले आहेत.
क्या महाराष्ट्र की सरकार चुनाव का चंदा ? या वसूली ? इस दिशा की और जांच करने की हिम्मत जुटाएगी ? हम मांग करते है कि इसकी जांच हो।
करोडों लोगों को रोजगार देते हुए देश की अर्थव्यवस्था में मह्त्वपूर्ण हिस्सा साझा करने वाले उद्योगपती मुकेश अंबानी के निवास के बाहर विस्फोटक क्या— Ram Kadam (@ramkadam) March 16, 2021
राम कदम यांनी केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे, महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करत आहे का ? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का ? त्या दृष्टीने तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कोट्यावधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या मुकेश अंबनी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचे कारण काय ? एक साधारण एपीआय दर्जाचा अधिकारी एवढं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का ? असा सवाल देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात साधू संत सुरक्षीत आहेत ना अंबानी यांच्यासारखे उद्योगपती असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.
एक साधारण API जैसा अफसर इतना बड़ा षड्यंत्र क्या अकेला इंसान कर सकता है ?
महाराष्ट्र में नाही साधू संत सुरक्षित हैं ? नाही अंबानी जैसे उद्योगपती ?— Ram Kadam (@ramkadam) March 16, 2021
NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील
‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल
Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा
ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त
Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR