मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे लसीकरणावरून महाराष्ट्राकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत sanjay raut यांनी सांगितले. त्यावरूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.
‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान
देशभरात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच लसीकरणाच्या मुद्यावरून संजय राऊत sanjay raut यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र मोठं राज्य आहे. केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भात महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईसारखे शहरही या राज्यात आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यात केंद्राने मदत केली. मात्र, इतर राज्यांनाही समान पद्धतीची मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील लोकही भारतीयच आहेत हे विसरू नका’.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीन भिन्न विचारांचे पक्ष सध्या राज्याचे सरकार चालवत आहेत. महाविकास आघाडी हा राज्यातील एक यशस्वी प्रयोग आहे. राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांनी याचा धडा घ्यायला हवा. महाराष्ट्राने देशाला नवीन मार्ग दाखवला आहे, असेही ते म्हणाले.
‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?
‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य
Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे