मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध प्रकरणे समोर येत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. तसेच विरोधकांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री नवाब मलिक nawab malik यांनी मोठं विधान केले आहे.
भाजपची नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर आता नवाब मलिक nawab malik यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यामध्ये मलिक म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे, असे राज्यपालांना भेटल्यानंतर भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही. राज्य सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे’.
प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’
सत्तेसाठी सगळे उपद्रव
देवेंद्र फडणवीस त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचे काम करत होते. फडणवीस यांचे असत्य काय आणि सत्य काय हे जनतेसमोर ठेवले आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळेच ते हे सगळे उपद्रव करत आहेत, अशा शब्दांत टीका केली.
राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता
…तर मग जयस्वाल पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का?
कनिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का? असा सवाल मलिक nawab malik यांनी उपस्थित केला. तसेच रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत आहेत. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही, असेही ते म्हणाले.
धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’
मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी
Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा