मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भांडुपमधील ड्रिम्स मॉलला आग लागली होती. त्यामध्ये रुग्णालय आगीच्या भक्ष्यस्थानी होते. यात 10 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील घटनास्थळी गेले आणि पाहणी केली. त्यावरून आता शिवसेनेकडून shivsena टीका केली जात आहे. ‘भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित झाली आहे. भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला विसरत नाहीत’, असे म्हटले.
‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार
राज्यात विविध मुद्यांवरून भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेनेकडून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना shivsena आमदार मनिषा कायंदे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित झाले आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला ते विसरत नाहीत. तसेच सीताराम कुंटे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकाऱ्यांवर ते अविश्वास दाखवत आहेत. त्यांची बदनामी करत आहेत. ही बाब अतिशय घृणास्पद आहे’.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आगीच्या घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी लोक आता दु:खात असल्याने यावर फार काही बोलणे योग्य होणार नाही. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता शिवसेनेकडून shivsena पलटवार करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा