सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेनेनं (ShivSena) सत्ताधारी भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भगवा फडकवला आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला आहे. भाजपचे नगरसेवक फुटल्यानं शिवसेनेला सत्तापरिवर्तन करण्यात यश आलं. सांगलीनंतर आता जळगाव महापालिकेतील सत्ताही भाजपनं गमावली आहे. यानंतर अनेक भाजप नेते शिवसेनेवर आरोप प्रत्यारोप करू लागले. या टीकेचा आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला असा थेट आरोप भाजपनं केला होता. याच टीकेला आता शिवसेनेचे संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, घोडेबाजाराचा आरोप कुणी कोणावर करावा ? भाजपनं याआधी घोडेबाजार केला नाही का. पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का असा थेट सवाल राऊत यांनी केला आहे.
…म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं म्हणत रोहित पवारांनी साधला जावडेकरांवर ‘निशाणा’
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत sanjay raut यांनी याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष बनवावं अशी मागणी देखील केली.
मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल
Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या
शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’
Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण
…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय
‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !