मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. पण त्यामध्ये कष्टकरी, निराधार, मजूर, बेघर, गरीबांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ chhagan bhujbal यांनी सांगितले. तसेच गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती पाहावी आणि मग सोशल मीडियावर व्यक्त करावे, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून शिवभोजन थाळीची सोशल मीडियावर टीका केली जात आहे. त्यावरून छगन भुजबळ chhagan bhujbal यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या वर्षी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पाहावी आणि मग सोशल मीडियावर व्यक्त व्हावे. संचारबंदीत गुरुवारी पहिल्याच दिवशी तब्बल 96,352 शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत 98,985 थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले, असे भुजबळ chhagan bhujbal म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना काळातही गेल्या वर्षी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे’.
Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’