मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर वारंवार करोनाच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्य शासनाची चिंता वाढली आहे. तर गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. याबाबीमुळे राज्यात आणखी एकदा लॉकडाउन लागतं का अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाउनसंदर्भात भाष्य केलं आहे.
हर्षवर्धन पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वीज तोडणी मोहीम हे ‘महाविकास’चं अपयश’
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. परंतु मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत, असे यावेळी ते म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे uddhav thackeray म्हणाले, परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. परंतु आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का यासंदर्भात माहिती अद्याप तरी दिलेली नाही. तर राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी दिली. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, ३ ते ४ महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. ज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधून लसीकरणाचा आढावा घेतला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांसोबत ‘वाझें पे चर्चा’
४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी –
कोरोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली.
‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका
आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय