मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. हे सरकार सुमारे दीड वर्षापासून सत्तेवर आहे. मात्र, काहीना काही कारणांमुळे या सरकारमधील मंत्री चर्चेत आहेत. आता चर्चा सुरु आहे ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची.
अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे यासाठी नाना पटोले nana patole यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यातच नाना पटोले यांनी मंत्रिपदाची अपेक्षा केल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी ऊर्जामंत्रिपदासाठी अप्रत्यक्षपणे इच्छा व्यक्त केल्याचीही माहिती दिली जात आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री असलेल्या नितीन राऊत यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी नितीन राऊत यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची चर्चा होती.
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
दरम्यान, नितीन राऊत यांनी त्यांच्याविरोधात कोण बातम्या देत आहे हे पाहिले पाहिजे, असे सांगत असल्या बातम्यांमुळे आपले मंत्रिपद जाणार नाही, असेही स्पष्ट केले. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका
आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय