मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशाची अर्थव्यवस्था अद्याप स्थिर झालेली नाही. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील jayant patil यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’, असा सवाल त्यांनी केला.
अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान
पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्यांवर मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी #WorldSleepDay या हॅशटॅगखाली ट्विट केले. त्यामध्ये जयंत पाटील jayant patil यांनी म्हटले, की ‘शेतकरी आंदोलनात जवळपास 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’
शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे.
केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?#WorldSleepDay
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 19, 2021
दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडून मोदी सरकारकडून सातत्याने टीका केली जात आहे. यापूर्वी त्यांनी लसीकरणावरून टोला लगावला होता. भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असे केंद्राचे धोरण आहे. मात्र, आधी देशातील लोकांना कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असे पाटील यांनी म्हटले होते.
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका
आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय