मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे यांच्या अटकेनंतर संपूर्ण मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करताना आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केले होते. पण दुसरीकडे मात्र शिवसेनेकडून परमबीर सिंग यांची पाठराखण करण्यात आली होती.
गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांसोबत ‘वाझें पे चर्चा’
शिवसेना कमिश्नर परमबीर सिंह की जयजयकार कर रही है।
गृह मंत्री जो #NCP के हैं,कल बोले कि कमिश्नर ने गलती की थी।
ये विरोधाभासी बयान सरकार की इमेज और खराब करेगी।#वाजेकांड की जाँच से अबतक समझ में आया है कि यह सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड है।
इसके तार शिवसेना से जुड़े हैं क्या ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 19, 2021
शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून परमबीर सिंग यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरत नाही असेदेखील शिवसेनेने म्हंटले आहे. यावरून संजय निरुपम sanjay nirupam यांनी शिवसेनेवर निशाणा साधत ‘वाझे प्रकरणही सत्ताधाऱ्यांचं वसुली कांड,’ असे बोलत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
‘शिवसेनेकडून परमबीर सिंग यांचा जयजयकार करण्यात येत आहे. तर राज्याच्या गृह मंत्रालयाने आयुक्तांची चूक असल्याचे सांगितले आहे. अशा विरोधाभास वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा अजून मालिन होत आहे. वाझे प्रकरणात आतापर्यंत जो तपास झाला त्यामध्ये हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचे लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?;’ असा सवाल देखील संजय निरुपम sanjay nirupam यांनी उपस्थित केला आहे.
‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका
आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय