मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात वाढत आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानंतर आता राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यावरून आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी राज्यातील आठ जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले.
‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर आणि नागपूर या जिल्ह्यांत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेतही आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच लॉकडाऊन हा शब्द वापरायची काही गरज नाही. पण कठोर निर्बंध लादण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश राज्याच्या सचिवांना दिले आहेत. जेव्हा तुमच्याकडील सर्व संसाधने संपतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा लॉकडाऊन करून साखळी तोडण्याची गरज असते. त्याशिवाय कोणता पर्यायही नसतो, असे राजेश टोपे rajesh tope म्हणाले.
Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !
…तर लॉकडाऊनचा विषयच येणार नाही
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी निर्बंध लागू आहेत. असे असले तरीही लोक नियम पाळत नाहीत. हे सातत्याने दिसत आहे. त्यामुळे आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे आणि दिले गेलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास लॉकडाऊनचा विषयच येणार नाही, असेही ते म्हणाले.
‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान
‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’
‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?
‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य