मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यानंतर आता भाजप आमदार राम कदम ram kadam यांनी टीका केली.
अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत‘ आहे.
एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का? https://t.co/jVcPuG11qy— Ram Kadam (@ramkadam) March 19, 2021
नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण, एमपीएससी परीक्षा यांसारख्या प्रकरणांवरून विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राम कदम यांनीही ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?’
देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— NCP (@NCPspeaks) March 18, 2021
दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत’, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. या ट्विटचा समाचार घेत राम कदम ram kadam यांनी विधान केले.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका
आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !
आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय