संगमनेर : सरकारसत्ता ऑनलाइन – ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फर्माच्या मालकांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी दिल्लीत गेले असते तर राज्याला मदत तरी मिळाली असती, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात balasaheb thorat यांनी फडणवीसांना लगावला. ते संगमनेरमध्ये बोलत होते.
कोरोना संकटात राजकारण करु नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. मात्र दुर्दैवाने तेच घडत असल्याची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे योग्य नसल्याचा टोला थोरात यांनी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लागावला.
‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात balasaheb thorat हे आज (रविवार) संगमनेर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावर भाष्य करताना दोन्ही विरोधी पक्षनेत्यांवर हल्ला चढवला.
भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !
ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’
एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत
Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’