पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यातील सरकार अस्थिर करणार असल्याची विधाने भाजपकडून सातत्याने केली जात होती. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी सरकार पाडण्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील chandrakant patil पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. मात्र, या सरकारकडे ना काही नियोजन, ना काही प्लॅनिंग. सरकारमध्ये विल पॉवर कमी असल्याने कोणताही निर्णय घेतला जात नाही. आठवीतील मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले’. तसेच विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. या नेतेमंडळींच्या दाव्यानंतर चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…
दीड हजाराची मदत देऊन गरीबांची चेष्टा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का? असा सवाल त्यांनी केला. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच प्लॅनिंग केले नाही, असेही ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’
फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’
महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं
पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्या पायाचे, बलात्कारी’
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’
Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’
अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी
कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…
चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’